राष्ट्रीय

सुमधुर व स्वर्गीय सूर हरपला ! भारतरत्न लता मंगेशकर यांच निधन.

Bharat Ratna Lata Mangeshkar

मुंबई, दि. 6 फेब्रुवारी, 2022 : ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी 6 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. लता मंगेशकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून येत नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

          आज दुपारी 12.30 ते 3 वाजेपर्यंत ‘प्रभूकुंज’ या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी लतादीदींचं पार्थिव ठेवलं जाणार असून सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान शिवाजीपार्क इथं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

          भारताची गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लतादीदींच्या जाण्याने झालेला शोक शब्दांत व्यक्त केला आहे.

          मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात 28 सप्टेंबर, 1929 रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांचं जन्मनाव ‘हेमा’ होतं. मात्र, वडिलांच्या एका नाटकात लतादीदींनी ‘लतिका’ नावाचं पात्र साकारलं, तेव्हापासून सगळेच त्यांना ‘लता’ म्हणू लागले आणि अशाप्रकारे ‘हेमा’ च्या त्या ‘लता’ झाल्या. लता ही कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी होती. मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ ही तिची भावंडं आहेत; सर्व निपुण गायक आणि संगीतकार आहेत.

          लतादीदींना छायाचित्रे काढायला खूप आवडते, तसेच क्रिकेटची मॅच बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे. लतादीदींना असंख्य पुरस्कार मिळाले. त्यापैकी 1969 साली ‘पद्मभूषण’ आणि 1999 साली ‘पद्मविभूषण’ हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. दरम्यान चित्रपटसृष्टीतील भरीव कामगिरीबद्दल देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके’ हा सर्वोच्च सन्मान 1989 साली त्यांना प्रदान करण्यात आला. एवढेच नव्हे, तर भारतातील सर्वोच्च समजला जाणारा ‘भारतरत्न’ हा किताब त्यांना 2001 साली प्रदान करण्यात आला.

          लतादीदींनी 980 पेक्षाही अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत. याशिवाय इतर वीस प्रादेशिक भाषांमधूनही त्यांनी गाणी गायली. संगीतकार सलील चौधरी यांनी ‘मधुमती’ या चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेल्या ‘आजा रे परदेसी’ या गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला.

          १९६२ साली चीनने भारतावर अनपेक्षितपणे आक्रमण केले. त्या युद्धात भारताचे शेकडो जवान धारातीर्थी पडले. या युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २७ जून १९६३ साली दिल्लीत एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी एक खास गीत ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे कवी प्रदीप यांनी लिहिले आणि त्या गीताला सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले होते. ते गीत लता दीदी यांनी गायले आणि ते अमाप लोकप्रिय झालेले गीत ऐकून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. मराठीतही दीदींनी असंख्य गाणी गायली आहेत. चित्रपट गीतांबरोबरच मराठीतील भावगीते त्यांनी गायली. ‘आनंदघन’ या नावाने त्यांनी काही चित्रपटांना संगीतही दिले.

          लतादीदींचे खूप गाजलेले पहिले गाणे म्हणजे 1949 सालच्या ‘महल’ या चित्रपटातले खेमचंद प्रकाश या संगीतकाराने स्वरबद्ध केलेले ‘आयेगा आयेगा आनेवाला’ हे गीत. हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. या गीतानंतर दीदींनी मागे वळून पाहिले नाही. मात्र, लतादीदी आज आपल्याला सोडून गेल्या असल्या तरी त्यांचा सुमधुर व स्वर्गीय सूर कायम त्यांची आठवण देत राहील.

About the author

achrekarsubhash

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Thursday
September 21, 2023
Mumbai
Sunrise: 6:27 AM
Sunset: 6:36 PM
Translate »
%d bloggers like this: