महाराष्ट्र पर्यटनविषयक

महाराष्ट्रातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना पंढरपूरशी जोडणाऱ्या 5 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे पंतप्रधानाच्या हस्ते राष्ट्रार्पण.

PM_Pandharpur

मुंबई, दि. 8 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात पंढरपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या पाच विभागाचे  आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे तीन विभाग यांचे  चौपदरीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले. याशिवाय राज्यातील महत्वाच्या तीर्थ क्षेत्रांना पंढरपूरशी  जोडणाऱ्या 5 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे त्यांनी  राष्ट्रार्पण केले. 574 किलोमीटर लांबीच्या या कामाचा अंदाजे खर्च 12,294 कोटी रुपये आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीआणि  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी रस्तेवाहतूक आणि केंद्रीय  महामार्ग राज्यमंत्री व्ही के सिंग यांच्यासह केंद्रीय मन्त्री नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील ,भारती पवार  या  कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळेला बोलताना पंतप्रधान म्हणाले की अनेक परकीय आक्रमणं  आणि नैसर्गिक आपत्ती आल्या तरीही निरंतर सुरु असलेली पंढरपूरच्या विठ्ठलाची ही वारी जगातली सर्वात जुनी यात्रा  आणि  मोठी जन चळवळ आहे. लाखो भाविकांना आकर्षून घेणारी, त्यांच्या अनोख्या शिस्त आणि सामुहिक वर्तनाचे प्रतिक असलेली  आषाढ वारी ही भारताच्या शाश्वत परंपरेची द्योतक आहे . विठठलाच्या अनेक पालख्या वेगवेगळ्या मार्गाने येत असल्या तरी त्याचे  पोहोचण्याचे ठिकाण जसे पंढरपूर आहे , तसे, मार्ग वेगळे असले तरी आपले सर्वांचे  लक्ष्य एकच आहे आणि अंतिमतः सर्व पंथ हे भागवत पंथ अशी शिकवण देणारी  ही वारी आहे असे त्यांनी सांगितले.

विष्णुमय जग ,भेदाभेद अमंगळ  या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत पंतप्रधानानी सांगितले की वारीमध्ये जातपात ,स्त्री पुरुष असा कुठलाही भेद  नाही आणि सर्वसमानतेचे हे एक  दुर्मिळ उदाहरण आहे. जेव्हा मी सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास  असे म्हणतो त्यामागे ही अशीच भावना असते जी  सगळ्यांना सोबत घेत आपल्याला देश विकासासाठी प्रेरित करते असे ते म्हणाले

रस्ते हे विकासाचे द्वार असतात आणि आज भूमिपूजन आणि लोकार्पण होत असलेले प्रकल्प आणि   पालखीमार्ग मार्ग हे भागवत धर्माची पताका उंचावणारे मार्ग असेतील असे पंतप्रधान म्हणाले. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला पायी चालणार्या भाविकांसाठी विशेष समर्पित मार्ग असतील असे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवरया महामार्गाच्या दोन्हीबाजूला सावली देणारे वृक्ष लावणे, पिण्यासाठी ठराविक अंतरावर शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे आणि भविष्यात पंढरपूर हे देशातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र अशी ओळख  करून देण्याचे काम जनभागीदारीच्या स्वरुपात करून आपल्याला आशीर्वाद द्यावा अशी मागणी पंतप्रधानांनी यावेळी  केली.

आपल्या प्रास्ताविक भाषणात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी म्हणाले की  त्यांचे मंत्रालय  20 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या बौद्ध सर्किट च्या धर्तीवर कैलास मानसरोवर पर्यंत जाण्यासाठी मार्ग बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे असे  केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

पंढरपूरच्या वारीतील संत  ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी मार्गावरील  8 रस्ता चौपदरीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन आणि  माहूर येथील रेणुका, शेगाव येथील श्री गजानन महाराज, तुळजापूर येथील भवानीमाता यासह  राज्यातील अन्य  महत्वाच्या तीर्थस्थळांना पंढरपूरशी  जोडणाऱ्या 5  राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण हा एक आनंदाचा क्षण आहे, असे गडकरी म्हणाले. या दोन्ही पालखी मार्गाचे काम आगामी सव्वा वर्षात पूर्ण करणार  असे गडकरी यांनी यावेळी सांगितले .

पालखी मार्गावरील सर्व अडथळे दूर करण्यासाठी केन्द्र सरकार आणि गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे आणि राज्य सरकार ही यासाठी आवश्यक ती मदत पुरवेल असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी  दिले. वारकरी संप्रदाय हा ऐहिक सुखाच्या पलीकडे जाऊन वारीत सहभागी होत असतो आणि हा भारावून टाकणारा अनुभव असे ठाकरे म्हणाले. परकीय आक्रमण झेलूनही वारकरी संप्रदायाने ही वारीची परंपरा चालू ठेवली याबद्दल ठाकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Thursday
September 21, 2023
Mumbai
Sunrise: 6:27 AM
Sunset: 6:36 PM
Translate »
%d bloggers like this: