राष्ट्रीय

‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ ही नव्या दमाच्या चित्रपट निर्मात्यांना उत्तम संधी. – मधुर भांडारकर

madhur-bhandarkar

पणजी, 21 नोव्‍हेंबर 2021 : उत्तम चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी उदयोन्मुख आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांकडे दर्जेदार कथानक असणे अत्यंत आवश्यक असून, त्यांचा आपल्या कथेवर दृढ विश्वास असायला हवा, असा सल्ला राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक, मधुर भांडारकर यांनी दिला . 52 व्या इफ्फीदरम्यान ‘चित्रपट निर्मिती’ या विषयावर झालेल्या मास्टरक्लासमध्ये ते बोलत होते. 

“माझ्या चित्रपटाच्या संकल्पनेचा जन्म कायम माझ्यापासूनच होतो. माझा माझ्यावर आणि माझ्या कथांवर पूर्ण विश्वास असतो. जेव्हा कधी माझ्या कथानकाबद्दल, माझ्या मनात पूर्ण विश्वास असतो, तेव्हाच मी चित्रपट निर्मिती करण्यास सुरुवात करतो.”, असे भांडारकर यावेळी म्हणाले.

आपला कॅमेरा जे क्षण चित्रबद्ध करतो, ते आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. त्यामुळे चित्रपटाची गती प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी असावी. मी नेहमीच कला आणि व्यावसायिक चित्रपटांमधील समतोल राखण्याचा प्रयत्न करतो तसेच, वास्तववादी चित्रपट बनवण्यावर माझा भर असतो.” असेही ते पुढे म्हणाले.

चित्रपट रासिकांशी संवाद साधतांना ते म्हणाले, “आजच्या काळात, ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे, नवोदित दिग्दर्शक आणि निर्मात्यांना उत्तम संधी मिळाली आहे.”

पेज थ्री आणि ट्रॅफिक सिग्नल अशा पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या मधुर भांडारकर यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीविषयी माहिती देतांना सांगितले की चाँदनी बार चित्रपटामुळे माझा या क्षेत्रात पुढे जाण्याचा आत्मविश्वास वाढला, “या चित्रपटाच्या सुरुवातीपासून मी गुंतलो होतो. जरी हा चित्रपट अत्यंत गडद आणि निराशाजनक विषयावरचा होता, तरीही, तो शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असेल, असा तयार करण्याचा मी प्रयत्न केला, असे त्यांनी पुढे सांगितले.

आपल्या भविष्यातील योजनांविषयी बोलतांना ते म्हणाले, “या कोरोना महामारीच्या काळात, आपण सगळेच अत्यंत कठीण आणि खडतर परिस्थितीतून गेलो, त्यामुळे आता मी लवकरच विनोदी चित्रपट निर्मितीसाठी काम करणार आहे.” 

चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अखेरीस, राष्ट्रीय चित्रपट विजेत्या दिग्दर्शिका नीला माहताब पांडा यांच्या हस्ते मधुर भांडारकर आणि तरुण आदर्श यांचा सत्कार करण्यात आला.

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Thursday
September 21, 2023
Mumbai
Sunrise: 6:27 AM
Sunset: 6:36 PM
Translate »
%d bloggers like this: