महाराष्ट्र राष्ट्रीय राज्य

नेहरू युवा केंद्र संघटनेतर्फे मुंबईत गेटवे ऑफ इंडिया परिसरातील कचरा आणि प्लॅस्टिक कचरा गोळा करून त्याचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने स्वच्छ भारत अभियानाचे आयोजन.

Cleaning

मुंबई, 18 ऑक्टोबर 2021 : पर्यावरण स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त राखणे तसेच प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे याबाबत जनजागृती करण्यासाठी आज मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत 50 हून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतला. नेहरू युवा केंद्र संघटनेने आयोजित केलेला हा कार्यक्रम म्हणजे केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सुरु केलेल्या एक महिना कालावधीच्या देशव्यापी स्वच्छ भारत अभियानाचा भाग आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात साजऱ्या होत असलेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत हे अभियान सुरु करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उषा शर्मा यांनी कुलाबा येथे, गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात आज झालेल्या या अभियानात सहभागी झालेल्या नेहरू युवा केंद्र संघटनेचे सदस्य तसेच स्थानिक युवक वर्ग अशा 50 हून अधिक स्वयंसेवकांना स्वच्छता शपथ दिली.

या उपक्रमाच्या महत्त्वाविषयी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना उषा शर्मा म्हणाल्या की, देशभरातील 744 जिल्ह्यांतील 6 लाख गावांमध्ये स्वच्छ भारत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. “या अभियानाद्वारे 75,000 किलो कचरा, विशेषतः प्लॅस्टिक कचरा संकलित करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आम्ही निश्चित केले आहे आणि ठरविलेल्या लक्ष्याहून कितीतरी अधिक प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात येणार आहे हे सांगताना मला आनंद होत आहे,” असे त्या म्हणाल्या.

उषा शर्मा यांनी अधिक स्पष्टीकरण देत सांगितले की जर एक युवक पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठी, प्लास्टिकचे प्रमाण कमी करण्यासाठी काही लोकांना प्रेरित करू शकत असेल तर एकत्रितपणे आपण सर्वजण स्वच्छतेबाबत जनतेत जाणीव निर्माण करण्यात नक्कीच यशस्वी होऊ. आणि यातून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजणे तसेच प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम समजणे या गोष्टी खात्रीपूर्वक घडू शकतील. “आपल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण प्लास्टिकच्या वापरावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणणे आवश्यक आहे,” असे उषा शर्मा यांनी पुढे सांगितले.

मुंबईतील आणखी एक लोकप्रिय पर्यटन केंद्र असलेल्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर उद्या सकाळी 9 वाजता नेहरू युवा केंद्र संघटना आणि युवा स्वयंसेवकांतर्फे अशीच आणखी एक स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Thursday
September 21, 2023
Mumbai
Sunrise: 6:27 AM
Sunset: 6:36 PM
Translate »
%d bloggers like this: