मनोरंजन महाराष्ट्र राष्ट्रीय राज्य

कोविड-19 महामारीच्या संकटानंतर पर्यटन क्षेत्राला आधार देण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना – केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

Paryatan

“चार्टर फ्लाईट्सच्या परदेशी पर्यटकांना नवीन पर्यटक व्हिसा मंजूर करणे सुरू, चार्टर फ्लाइट्स व्यतिरिक्त अन्य पर्यटकांना 15 नोव्हेंबर पासून नवीन पर्यटक व्हिसा मिळणार”

पणजी, 18 ऑक्टोबर 2021 : केंद्रीय बंदरे, जहाज, जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज भारतीय पर्यटन, गोवा कार्यालयाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या आठवडाभराच्या मोहिमेचे पणजी येथे उद्घाटन केले. भारतीय पर्यटनाचे प्रादेशिक संचालक व्यंकटेशन दत्तात्रयन आणि व्यवस्थापक जितेंद्र जाधव यांची यावेळी उपस्थिती होती.

“स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आझादी का अमृत महोत्सव हे पंतप्रधानांचे उद्दिष्ट्य म्हणजे, हा ऐतिहासिक, गौरवशाली आणि तितकाच उत्सव भव्यतेने आणि उत्साहाने साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण उत्सव आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा हा महोत्सव हा भारताच्या नागरिकांना अर्पण केलेला आहे”, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

पुढे बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले, कोविड – 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पर्यटन क्षेत्राला आधार देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. सरकारने व्यवसायाच्या सातत्यासाठी आणि धोरणासाठी पर्यटन क्षेत्रासह उद्योगासाठी अनेक नियामक आणि आर्थिक मदत उपायांचा विस्तारही केला आहे.

भारतात येणाऱ्या चार्टर फ्लाइट्सच्या परदेशी पर्यटकांना सरकारने 15 ऑक्टोबर 2021 पासून नवीन व्हिसा देण्यास प्रारंभ केला आहे. चार्टर विमानाव्यतिरिक्त अन्य उड्डाणाद्वारे भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांना 15 नोव्हेंबर 2021 पासून हे करता येईल. पर्यटन मंत्रालयाने देशात पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी अनेकविध योजना आखल्या आहेत. `स्वदेस` आणि `प्रसाद` ही योजना राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक सहाय्य पुरविते.

गोवा राज्यासाठी मंत्रालयाने `स्वदेस दर्शन योजने`अंतर्गत रुपये 197 कोटी मंजूर करण्यात आले होते आणि हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. कोस्टल सर्किट – 1 च्या विकासास 2017 -18 मध्ये रुपये 99.35 कोटी मंजूर करण्यात आले होते. हा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली.

18 ते 24 ऑक्टोबर 2021 दरम्यान आझादी का अमृत महोत्सव या राष्ट्रीय उत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाचे गोवा क्षेत्रीय कार्यालय यांनी मॉल ब्रँडिंग एक्टिव्हिटीद्वारे आठवडाभराची मोहीम सुरू केली आहे. भारतीय पर्यटन गोवा यांच्या वतीने देखील मॉलमध्ये भेट देणाऱ्यांसाठी स्पॉट ड्राइंग आणि पेंटिंग स्पर्धा घेण्यात येणार आहे.

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Friday
December 8, 2023
Mumbai
Sunrise: 6:59 AM
Sunset: 6:00 PM
Translate »
%d