सामान्य ज्ञान ब्लॉग

‘पाल’ अंगावर पडल्यास अंघोळ का करतात ?

 

‘पाल’ ही घरातील भिंतींवर व छतावर वावरणारी व सरपटणारा प्राणी आहे. पण सापालाही न घाबरणारी माणसं मात्र ‘पाली’ला घाबरतात. कारण काय तर पाल दिसायला खूपच विचित्र आणि किळसवाणी असते. असे म्हणतात की, पाल जर अंगावर पडली तर तो अपशकून झाला असं समजून लगेच अंघोळ करायला हवी. काहीजणांच्या मते ही अंधश्रद्धा आहे.
खरंतर माणसांसाठी पालीचा स्पर्शही वाईटच असतो. शरीराच्या ज्या भागाला पालीचा स्पर्श होईल तो भाग साबणाने स्वच्छ धुवून घ्यावा. यालाही शास्त्रीय कारण आहे. पाल ही ‘रज्जुमान संघ’ (Phylum chordate – फायलम कोरडाटा) या समूहात मोडते. रज्जुमान संघाचे विभाजन (१) पुच्छरज्जुमान, (२) शीर्षरज्जुमान व (३) पृष्ठवंशी अशा तीन उपसंघामध्ये केले जाते. पृष्ठवंशी प्राण्यांचे ‘जंभहीन’ आणि ‘जंभयुक्त’ असे दोन विभाग करण्यात आलेले आहेत; त्यापैकी ‘जंभयुक्त’ विभागाच्या सहा वर्गांपैकी एक असलेल्या ‘सरीसृप’ गटात पालीचा समावेश होतो. तिची ‘काळसर विष्ठा आणि मूत्र (युरिक आम्लाचे पांढरे स्फटिक)’ हे एकत्रित लगद्याच्या स्वरूपात विसर्जित केले जाते. त्यामुळे जेव्हा पाल आपल्या अंगावर पडते तेव्हा किंवा पडताना तीची ‘काळसर विष्ठा आणि मूत्र (युरिक आम्लाचे पांढरे स्फटिक)’ शरीरावर पडण्याची किंवा विसर्जित होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे त्वचारोग किंवा शारीरिक व्याधी होऊ नयेत म्हणून पाल अंगावर पडली तर लगेच अंघोळ करायला हवी, असे सांगितले जाते.
खरंतर, पाल ही बिनविषारी असते. मात्र, तिच्या शरीरात साल्मोनेल्ला, लिस्टेरिया, एश्चेरिकिया कोलाय यांसारखे जीवाणू असतात. शिजविलेल्या अन्नात पाल पडली की तिच्या शरीरातील जीवाणूंमुळे अन्न दूषित होते. असे दूषित अन्न खाल्ल्याने मनुष्याला विषबाधा होते.
-सुभाष राजाराम आचरेकर, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Friday
June 2, 2023
Mumbai
Sunrise: 6:00 AM
Sunset: 7:12 PM
Translate »
%d bloggers like this: