महाराष्ट्र राष्ट्रीय राज्य

‘उत्कृष्ट राष्ट्रीय महामार्ग 2019’ या पुरस्कारासाठी अर्ज करा.

NHE AWARD

नवी दिल्ली,  15 सप्टेंबर  : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्टता पुरस्कार 2020 साठी अर्ज मागवले आहेत. हे पुरस्कार दरवर्षी सहा गटात दिले जातात.

हे सहा गट म्हणजे, उत्कृष्ट प्रकल्प व्यवस्थापन, उत्कृष्ट अंमलबजावणी आणि देखरेख, हरित महामार्ग, नाविन्यपूर्ण कल्पना, उत्कृष्ट महामार्ग सुरक्षा, उत्कृष्ट  टोल व्यवस्थापन आणि आव्हानात्मक परिस्थितीतील अपवादात्मक काम. या पुरस्कारासाठी तयार केलेल्या विशेष पोर्टल https://bhoomirashi.gov.in/awardsवर  या महिन्याच्या 19 तारखेपर्यंत   अर्ज भरून द्यावेत . या वर्षी डिसेंबरमध्ये विजेत्यांची नावे घोषित केली जातील.

ही पारितोषिके 2018 मध्ये सुरू करण्यात आली. 2018 मध्ये याच्या पहिल्या फेरीला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. या पहिल्या फेरीनंतर मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्टता पारितोषिक हे दर वर्षी देण्याचा निर्णय घेतला.

बांधकाम व्यवस्थापन, देखभाल तसेच टोल जमा करणं , महामार्गाची सुरक्षितता या महामार्ग व्यवस्थापनामधील कळीच्या गोष्टी आहेत ‌. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या कंपन्या शोधणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.

ही पारितोषिके दरवर्षी दिली जाण्याचे उद्दिष्ट म्हणजे त्यानिमित्ताने महामार्ग व्यवस्थापनातील विविध कंपन्यांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण व्हावी तसेच रस्ते वाहतूकीचे जाळे विस्तारण्याच्या कामी संबंधितांचे हातभार लागावेत हे होय.

दरवर्षी या पारितोषिकांची घोषणा होत असल्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीत महामार्ग व्यवस्थापनात अपवादात्मकरित्या उत्कृष्ट काम करणार्‍यांना मंत्रालयाकडून ओळख मिळावी.  तसंच सेवा देतानाही त्यात उत्कृष्टतेचा ध्यास घेणाऱ्या कंपन्यां समजाव्यात असा यामागे मंत्रालयाचा उद्देश आहे.

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Friday
December 8, 2023
Mumbai
Sunrise: 6:59 AM
Sunset: 6:00 PM
Translate »
%d