महाराष्ट्र राष्ट्रीय राज्य

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) च्या विविध उपक्रमांचा घेतला आढावा

Meeting pic

नवी दिल्ली, २४ ऑगस्ट : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज नवी दिल्लीत  एनआयओएसच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. या बैठकीला  शालेय शिक्षण आणि  साक्षरता विभागाच्या सचिव  अनिता करवाल, शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव  स्वीटी चांगसन आणि एनआयओएसचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकी दरम्यान  पोखरियाल  यांनी संस्थेच्या पारदर्शक कामकाजावर  भर दिला जेणेकरून त्याचे उत्तम परिणाम दिसतील. त्यांनी  परीक्षा यंत्रणा बळकट करण्यावरही चर्चा केली. ते म्हणाले की, जर आम्हाला संस्थेमध्ये काही अनियमितता आढळली तर दोषीविरुद्ध  कठोर कारवाई केली जाईल.  त्यांनी एनआयओएस अधिकाऱ्यांना निर्देश दिले की एनआयओएस परीक्षा केंद्रांबाबत तुमच्याकडे काही तक्रारी आल्या तर तुम्ही शक्य तितक्या  लवकर तक्रारींचे निवारण करा. प्रतिष्ठित संस्थेच्या अखंडतेवर कुणीही  प्रश्नचिन्ह निर्माण करू नये म्हणून त्यांनी एनआयओएस अधिकाऱ्यांना परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. केंद्रीय मंत्र्यांनी एक डॅशबोर्ड तयार करण्याची सूचना केली ज्यात देशभरातील सर्व केंद्रांची तपशीलवार माहिती आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे. त्यात सर्व हितधारकांकडील माहिती आणि सूचना असतील जेणेकरून प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढेल.

शिक्षणमंत्री म्हणाले की एनआयओएस ही जगातील सर्वात मोठी मुक्त शालेय शिक्षण प्रणाली आहे आणि तळागाळापर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी  आपण त्याचा अधिक प्रभावीपणे वापर केला पाहिजे. ते म्हणाले की आपल्या देशातील अशिक्षित लोकांना साक्षर करण्यासाठी आपण देखील त्याचे जाळे उपयोगात आणायला  हवे. यासंदर्भातील संभाव्यतेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी एक पथक स्थापन  करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

About the author

ACHUKVARTA

Add Comment

Click here to post a comment

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Friday
December 8, 2023
Mumbai
Sunrise: 6:59 AM
Sunset: 6:00 PM
Translate »
%d